नऱ्हे (प्रतिनिधी) : गेली दोन दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी माजी खासदार व भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी कोल्हापूर दौऱ्याचे आयोजन केले होते. परंतु काल रात्री कराड येथे त्यांना रोखण्यात आले.
“मी इडी कडे 10 तक्रारी दिल्या असून मंत्री अमित देशमुख, अनिल परब, व मुश्रीफ यांचेविरुद्ध सबळ पुरावे असल्यामुळे त्यांना कोणीही वाचवू शकत नाही .
– किरीट सोमय्या, भाजप नेते
त्यामुळे सोंमया आज परतीच्या प्रवासासाठी जात असताना नऱ्हे येथील उपसरपंच सागर भूमकर याच्या निवसास्थानी भोजन करण्यासाठी थांबले होते.
“आज माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांच्या घरी आदरणीय किरीट सोमय्या यांनी भेट दिली.त्यामुळे मला बळ मिळाले असून यापुढे अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद मिळाली आहे. यापुढे मी व माझे कार्यकर्ते नेहमीच अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी तयार आहोत व सोमय्या यांचे बरोबर आहोत.
– सागर भूमकर (उपसरपंच नऱ्हे, ग्रामपंचायत)
त्यावेळी दैनिक प्रभातचे प्रतिनिधी यांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता, माझ्याकडे ठोस पुरावा असून मंत्री हसन मुश्रीफ यांना कोणीही वाचवू शकत नाही. अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली.