Baramati Agro : राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार यांच्या बारमती अॅग्रो कंपनीवर केंद्रीय तपास यंत्रणांनी आज छापेमारी केली. सकाळपासून बारामती अॅग्रोच्या सहा कार्यालयावर ईडीकडून तपास करण्यात येत आहे. गेल्या वर्षी रोहित पवार यांना याबाबत नोटीस आली होती.
आता त्यांच्या कंपनीवर छापेमारी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने छापेमारी केल्यानंतर कंपनीत इतर कुणालाही प्रवेश देण्यात येत नाही. बारमती अॅग्रो कथित गैरव्यावहार प्रकरणी मुंबईसह सहा ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे.
दरम्यान, ईडीची ही कारवाई सुरु असतानाच आता भाजप नेते किरीट सोमय्या यांचं एक ट्विट व्हायरल होतंय. याशिवाय स्वत: किरीट सोमय्या यांनीदेखील त्या ट्विटचा फोटो पुन्हा शेअर करत रोहित पवारांविरोधात कारवाईची मागणी केली आहे. किरीट सोमय्या यांनी 1 जुलै 2021 ला रोहित पवार यांच्याविरोधात ट्विट केलं होतं. आणि आता हेच ट्विट पुन्हा एकदा व्हायरल होताना दिसत आहे.
किरीट सोमय्या यांचं ट्विट नेमकं काय…
I once again request all investigative agencies to expedite investigation against #RohitPawar #BaramatiAgro
Hundreds Crores Kannada Sahkari Sakhar Karkhana was taken over by Baramati Agro at ₹50 crores. @BJP4India@Dev_Fadnavis@mieknathshinde pic.twitter.com/MZSj6ZSwuY
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 5, 2024
“मी पुन्हा एकदा तपास यंत्रणांना रोहित पवार यांच्याविरोधात सखोल तपास करण्याची विनंती करतो. कोट्यवधी रुपयांचा कन्नड सहकारी साखर कारखाना बारामती अॅग्रोने अवघ्या 50 कोटी रुपयांत विकत घेतला होता..’ असं किरीट सोमय्या यांनी आपल्या नव्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
रोहित पवार यांचं सूचक वक्तव्य….
हा आहे स्वाभिमानी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा चेहरा… ज्यांनी पिढ्यान् पिढ्या #महाराष्ट्र_धर्म जपला आणि वाढवला…
अन्यायाविरोधात प्रसंगी संघर्ष करण्याची शिकवणही या महान विभूतींनी दिल्याने महाराष्ट्र भूमीला संघर्षाचाही प्रदीर्घ इतिहास आहे. म्हणून मराठी माणूस या नात्याने… pic.twitter.com/eBMxFe9Sj4— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 5, 2024
“हा आहे स्वाभिमानी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा चेहरा.ज्यांनी पिढ्यान् पिढ्या महाराष्ट्र धर्म जपला आणि वाढवला. अन्यायाविरोधात प्रसंगी संघर्ष करण्याची शिकवणही या महान विभूतींनी दिल्याने महाराष्ट्र भूमीला संघर्षाचाही प्रदीर्घ इतिहास आहे. म्हणून मराठी माणूस या नात्याने महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रत्येकाला संघर्षाचीही तयारी ठेवावी लागेल…’ या आशयाचे ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.