Kirit Somaiya On MVA| – तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढून त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावला नसता तर शरद पवार व उद्धव ठाकरे यांनी भाजपला संपवले असते, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी एका ऑनलाइन वृत्तपत्राशी बोलताना केला आहे. मविआ सरकारने विरोधी पक्षांच्या नेत्यांना तुरुंगात डांबण्याचा कट रचला होता, असेही ते यावेळी म्हणाले.
सोमय्या यांनी शुक्रवारी पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. ते म्हणाले, उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढून त्यांच्यामागे चौकशी लावणे ही तेव्हाची राजकीय गरज होती, असेही किरीट सोमय्या या प्रकरणी प्रामुख्याने अधोरेखित करताना म्हणाले. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांवरील एकही केस भाजपने मागे घेतली नाही. Kirit Somaiya On MVA|
या सर्व केसेस सुरू आहेत. आमच्या पक्षात यापुढे भ्रष्टाचार नाही. पुन्हा असे झाले तर किरीट सोमय्या याविरोधात निश्चित आवाज उठवणार. सत्तेतील नेत्यांचा भ्रष्टाचार समोर आला तर मी कुणाचेही ऐकणार नाही, असेही सोमय्या यावेळी ठणकावून सांगत म्हणाले.
…अन् झेड सेक्युरिटी मिळाली
भावना गवळीच्या लोकसभा मतदार संघात वाशिममधील एका गावात काही लोकांनी मला घेरावा घातला. माझ्या गाडीवर दगडफेक केली. मी तेव्हा थोडक्यात बचावलो. या घटनेनंतर 10 मिनिटांतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मला फोन आला.
त्यांनी मला कुठे लागले का? अशी विचारणा केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मला झेड सेक्युरिटी मिळाली. पक्षाने मला संरक्षण पुरवून एकप्रकारे माझ्या कामाची पोचपावतीच दिली, असेही किरीट सोमय्या यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा: