नवी दिल्ली : देशात करोनाची दुसरी लाट ओसरत आहे असे सांगितले जात असले तरी अजूनही रुग्णसंख्येत म्हणावी तशी घट झाली नसल्याची दिसत आहे. त्यातच पुन्हा एकदा चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. देशात गेल्या २४ तासांत ४० हजार १२० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच ५८५ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय ४२ हजार २९५ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.
India reports 40,120 new #COVID19 cases, 42,295 recoveries & 585 deaths in the last 24 hrs, as per Union Health Ministry.
Total cases: 3,21,17,826
Total recoveries: 3,13,02,345
Active cases: 3,85,227
Death toll: 4,30,254Total vaccinated: 52,95,82,956 (57,31,574 in last 24 hrs) pic.twitter.com/UON8OyTLU5
— ANI (@ANI) August 13, 2021
आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ४० हजार १२० नवे रुग्ण आढळल्यामुळे एकूण रुग्णसंख्या ३ कोटी २१ लाख १७ हजार ८२६ इतकी झाली आहे.
दरम्यान,देशात उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३ कोटी १३ लाख २ हजार ३४५ वर पोहोचली आहे. देशात सध्या ३ लाख ८५ हजार २२७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
दरम्यान, देशात करोनामुळे आतापर्यंत ४ लाख ३० हजार २५४ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान देशात आतापर्यंत ५९ कोटी ९५ लाख ८२ हजार ९५६ लोकांचं लसीकरण झालं आहे.