पुणे -करोना बाधित व्यक्ती गृहविलगीकरणात राहणार असेल तर त्यासाठीच्या नियमात केंद्र सरकारने सुधारणा केली असून, सुधारित नियम जारी केले आहेत.
करोनाची सौम्य लक्षणे असल्यास गृहविलगीकरणाचा सल्ला दिला जातो. महाराष्ट्रात सध्या जवळपास 37 लाख व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत. या रुग्णांसाठी केंद्र सरकारने नवी नियमावली जारी केली आहे.
असे आहेत सुधारित नियम
रुग्णांसाठी खोलीला संलग्न-स्वतंत्र स्नानगृह आवश्यक
इतर आजार आणि वृद्ध रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानेच गृह विलगीकरणाची परवानगी
रुग्णांची पूर्णवेळ काळजी घेणारी व्यक्ती असावी. त्याचा रुग्णालयाशी नियमित संपर्क असावा.
रुग्णांनी घरात असतानाही तीन पदरी वैद्यकीय मास्क वापरावा. तो दर आठ तासांनी बदलणे गरजेचे.
रुग्ण राहत असलेल्या खोलीत हवा खेळती राहिली पाहिजे.
टेबल, दाराच्या कड्या, हॅन्डल यांसारख्या वस्तू फिनाइलने स्वच्छ करावेत.
सलग दहा दिवस कोणताही त्रास नसल्यास रुग्णाचे विलगीकरण संपेल.
रुग्णाची काळजी घेणारी व्यक्ती हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन गोळी घेऊ शकते.