नाना पाणी म्हणौनि मासा। गंगा न सांडितां जैसा। सर्व तीर्थ सहवासा। वरपडा जाला ।।909।। अगा जया जें विहित। तें ईश्वराचें मनोगत। म्हणौनि केलिया निभ्रांत। सांपडेचि तो ।।911।। पैं
जीवाचे कसीं उतरली। ते दासी कीं गोसावीण जाली। सिसे वेंचि तया मविली। वही जेवीं ।।912।। तैसें स्वामीचिया मनोभावा। न चुकिजे हेचि परमसेवा। येर तें गा पांडवा। वाणिज्य करणें ।।913।। (अध्याय 18)
केवळ पाणी समजून गंगेत राहिलेल्या माशाला तेथे राहिल्याने जसा सर्व तीर्थाचा सहज लाभ होतो, तसे आपल्या विहित कर्माचे आचरण केल्यावाचून दुसरा उपायच नाही. ज्यांचे जे विहित कर्म नेमलेले आहे, ते त्यांनी करणे हेच ईश्वराचे मनोगत आहे.
ते कर्म केले असता ईश्वर प्राप्त होतो. दासी असूनही जर राजाच्या कसोटीस उतरली, तर तीच सर्वांची स्वामिनी होते तसे ईश्वराच्या मनोभावाप्रमाणे वागणे हीच त्याची परमसेवा होय. यावाचून जे दुसरे कृत्य करतात, ते अर्जुना, वाणिज्य कर्माप्रमाणे आहे.