मुंबई – महाराष्ट्रात करोना व्हायरसचा वेग काहीसा कमी होत असल्याची सकारात्मक बातमी आहे. बऱ्याच दिवसांनंतर करोनाची लागण होण्याची संख्या 60 हजारांच्या खाली आली आहे. रविवारी 56 हजार 647 नवीन रुग्ण आढळल्याने आशेचा किरण दिसू लागला आहे. आज राज्यात ४८ हजार ६२१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५९ हजार ५० रुग्णांनी करोनावर मात केली असून ५६७ मृत्यू झाले आहेत.
महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 47 लाख 22 हजार 401 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 39 लाख 81 हजार 685 लोकांनी करोनावर मात केली आहे. रविवारी 51 हजार 356 लोकांना करोनामधून मुक्त करण्यात आले आहे. परंतु नवीन पॉझिटिव्ह रुग्णसंख्येच्या तुलनेत बऱ्या झालेल्या लोकांची संख्या कमी असल्यामुळे परिस्थिती तशी चिंताजनक आहे.
जरी संसर्ग फारसा कमी झालेला नसला तरी तो किमान स्थिर आहे. ही देखील चांगली बातमी आहे. त्यामुळे ही सगळी परिस्थिती पाहता राज्य सरकारच्या कडक लॉकडाऊनचा निर्णय योग्य सिद्ध होताना दिसत आहे; परंतु मृत्यूच्या संख्येत फारशी सुधारणा होताना दिसत नाही. एका दिवसात करोनाच्या मृतांचा आकडा 669 आहे. शनिवारी ही संख्या 800 पेक्षा जास्त होती.
करोनाची दुसरी लाट आली, तेव्हा मुंबईत संसर्ग खूप वेगाने वाढला होता; परंतु गेल्या अडीच आठवड्यांपासून संसर्गाची गती कमी होत आहे. रविवारी मुंबईत 3 हजार 672 नवीन प्रकरणांची नोंद झाली. त्याच वेळी, 5 हजार 544 लोक बरे झाले आहे.