मुंबई – राज्यावर ओढावलेले करोनाचे संकट सध्या मोठ्या प्रमाणात वाढलेले असल्यामुळे आता महाविकास आघाडी सरकारने लॉकडाऊन लावण्याच्या दिशेने हालचाली सुरु केल्या आहेत. त्यासाठी राज्यातील करोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मुंबईत युद्धपातळीवर तयारी सुरु आहे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खास रणनीती महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आखली आहे. साधारण गुढीपाडव्यानंतर लॉकडाऊन जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मुंबईत हा ऍक्शन प्लॅन अंमलात आणला जाणार आहे.
मुंबई महानगरपालिका त्यासाठी शहरातील पंचतारांकीत हॉटेल्स ताब्यात घेणार आहे. कोविड सेंटरमध्ये या हॉटेल्सचे रुपांतर करण्यात येईल. याचा वापर करोनातून बरे झालेल्या रुग्णांना ठेवण्यासाठी केला जाईल. तसेच या सगळ्या कामांवर देरखेख ठेवण्यासाठी मुंबईच्या 24 वॉर्डांमध्ये नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.