मुंबई – करोनाबाधित रुग्णांची संख्या रोज नवनवीन उच्चांक गाठत आहे. राज्यात करोनाची परिस्थिती अधिक गंभीर होताना दिसत आहे. कारण आज राज्यात करोना रुग्णांच्या उच्चांकांची नोंद झाली आहे. आज 63 हजार 294 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात शनिवारी 55 हजार 411 नवीन रुग्णांची नोंद झाली होती.
आज 34 हजार 008 रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 349 रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.7 टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 27 लाख 82 हजार 161 करोनाबाधित रुग्णांनी करोनावर मात केली आहे.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.65 टक्के एवढे झालेआहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,21,14,372 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 34,07,245 (15.41 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 31,75,585 व्यक्ती होम क्वारंटाईन, तर 25,694 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
दुसरीकडक मुबंईत 24 तासात 9989 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8554 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. आजवर 4 लाख 14 हजार 641 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर बरे झालेल्या रुग्णांचा दर 79 टक्के आहे. सध्या मुंबईत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 92 हजार 464 आहे. तर रुग्ण दुप्पटीचा दर 35 दिवसांवर आला आहे.