मुंबई – राज्यातील झपाट्याने वाढणाऱ्या संसर्गामुळे सर्व महत्वाच्या आरोग्य सुविधांवर विशेषत: बेड्स, व्हेंटीलेटर आणि ऑक्सिजनवर प्रचंड ताण येत आहे. काही दिवसांनी सर्वसमान्य रुग्णांना उपलब्ध होणे कठीण होणार आहे, अशी माहिती आरोग्य प्रधान सचिव डाॅ. प्रदीप व्यास यांनी दिली आहे.
राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. बेड्स व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडताहेत. त्यापार्श्वभूमीवर आज (ता.28 मार्च) दुपारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित टास्कफोर्सची बैठक पार पडली. डाॅ. प्रदीप व्यास यांनी राज्यातील बेड्स, व्हेंटीलेटर संदर्भात माहिती दिली.
दरम्यान, आजच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाॅकडाऊनची तयारी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. ‘मत्रालय, शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अभ्यागतांना पूर्ण बंदी घालीव तसेच खासगी कार्यालये व आस्थापना 50 टक्के कर्मचारी संख्येने निर्बंध पाळत नसतील तर लाॅकडाऊनची तयारी करावी,’ अशा स्पष्ट सूचना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.
या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्स डाॅक्टर्स व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. करोनाचे निर्बंध आणि नियमांचे कडक पालन होणार नसेल तर येत्या काही दिवसांत संपूर्ण लाॅकडाऊन लावू संसर्ग थोपवावा या विषयावर बैठकीत चर्चा झाली.