मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांचा आलेख वाढतच जात असल्याचे दिसत आहे. रोज रुग्णसंख्येत भरच पडताना दिसत आहे. दरम्यान, मागील २४ तासांत देखील राज्यात कोरोना रुग्णांची रेकॉर्डब्रेक नोंद करण्यात आली आहे.आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वतः ट्विट करत महत्त्वाची माहिती जनतेला दिली आहे. ट्विट करत त्यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशाराच दिला आहे.
महाराष्ट्रात रोज नव्याने कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण हे काही अंशी वाढतानाच दिसत आहे. अर्थात काही दिवस याला अपवादही ठरत आहेत. दरम्यान, रविवारी एका दिवसात राज्यात तब्बल 30535 नवे कोरोना रुग्ण आढळले. तर, 11314 कोरोना रुग्णांनी या संसर्गावर मात केली. आतापर्यंत राज्यात एकूण 2214867 कोरोना रुग्णांनी या संसर्गावर मात करण्यात यश मिळवलं आहे.
राज्यात आज 30535 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 11314 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2214867 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 210120 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 89.32% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 21, 2021
‘राज्यात आज 30535 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 11314 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2214867 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 210120 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 89.32% झाले आहे.’, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.
मुंबईतही रविवारी दिवसभरात 3775 नवे कोरोनाबाधित आढळून आहे. ज्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत आढळून आलेल्या कोरोना रुग्णांचा आकडा 3,62,654 वर पोहोचला आहे. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार दिवसभरात 10 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला. ज्यामुळे मृतांचा एकूण आकडा 11582 वर पोहोचला. 10 रुग्णांपैकी 7 जण कोमॉर्बिड रुग्ण होते.