नवी दिल्ली – एकीकडे करोनाचे रूग्ण पुन्हा वाढू लागले असताना आता या मुद्द्यावर पुन्हा राजकारणही सुरू झाले आहे का, असा सवाल केला जातो आहे. त्याचे कारण म्हणजे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्य सरकारला पत्र पाठवले असून राज्यात टेर्स्टीग, ट्रिँकंग आणि आयसोलेशनबाबत बेजबाबदारपणा दाखवला जात असल्याचे या पत्रात म्हटले आहे.
महाराष्ट्रात कंटन्मेंट झोनकडेही दुर्लक्ष केले जात आहे. औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालय, नाशकातील वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय येथील मृत्यू दर जास्त असल्याकडेही पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे. औरंगाबादेत मुंबईपेक्षा जास्त बाधित आढळत असूनही तेथे योग्य प्रकारे चाचण्या केल्या जात नसल्याचे नमूद करतानाच कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकडे दुर्लक्ष होत असल्याने बाधितांची संख्या झपाट्याने वाढते आहे. करोनाच्या संदर्भात जे निकष तयार करण्यात आले आहे त्यांचेही सक्तीने पालन केले जात नसल्याची टीप्पणी करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी टीम पाठवण्यात आली होती. त्यानंतर हा अहवाल तयार करण्यात आला आहे.