बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालन ही आपल्या अभिनयासोबत बेबाक अंदाजासाठी ओळखली जाते. तसेच सामाजिक मुद्दांवर आपले स्पष्ट मत मांडत असल्याने ती सतत प्रसिद्धीच्या झोतात असते. दरम्यान, विद्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लग्नाबाबत आपले मत मांडले आहे.
View this post on Instagram
विद्या बालन म्हणाली, लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी जोडीदार हे एकमेकांना सहजतेने घेवू लागतात. तसेच लग्न हे खूपच गुंतागुंतीचे काम आहे. ते या गोष्टीशी सहमत असतात की, लग्नानंतर त्यांना अशा व्यक्तीसोबत राहायचे आहे, ज्यांना आपण जास्त ओळखत नसतो. यामुळेच जोडीदाराला सहजतेने घेणे खूप सोपे जाते आणि ही सर्वात धोकादायक गोष्ट आहे.
View this post on Instagram
मी आठ वर्षांत हेच शिकली आहे की, लग्न टिकविण्यासाठी एकमेकांना सतत समजून घेण्याचा प्रयत्न करावा न की हलकेपणाने घेणे, असे विद्याने सांगितले. दरम्यान, विद्या बालनने 14 डिसेंबर 2012 रोजी सिद्धार्थ रॉय कपूरशी लग्न केले होते. विद्याच्या अचानक झालेल्या लग्नामुळे चाहत्यांसह सेलेब्रिटीजही चकित झाले होते. परंतु, लग्नानंतरही विद्याने सतत आपल्या अभिनयातून चाहत्यांवर आपली छाप कायम ठेवली आहे.
View this post on Instagram
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास ती लवकरच “शेरनी’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित सूरकर यांनी केले आहे. यात विद्या बालन ही एका फॉरेस्ट अधिका-याची भूमिका साकारत आहे. “मिशन मंगल’नंतर विद्याला मोठया पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.