कोल्हापूर (प्रतिनिधी) – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज शरसंधान साधलं आहे.काही वेळापूर्वी चंद्रकांत पाटलांनी महाविकास आघाडीत बेबनाव असल्याचं विधान केले होते. याला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिउत्तर दिलं आहे.
महाविकास आघाडीमध्ये समन्वय नाही म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी अविश्वास ठराव आणावा अस आव्हान हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांना दिलं आहे. तसंच ही तिघांची आघाडी किती भक्कम आहे ते समजेल असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.
दरम्यान गोकुळची निवडणूक घेण्याचा मार्ग उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आज खुला झाला आहे. गोकुळ ची निवडणुक महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याची घोषणा हसन मुश्रीफ यांनी केली आहे. सतेज पाटील, पी एन पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीत निर्णय घेतल्याची मुश्रीफ यांची माहितीही दिली आहे. तसंच निवडणुका बिनविरोध होत नाहीत मात्र महाविकास आघाडी एकत्रित या निवडणुका लढवण्यासाठी तयारी करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे
अनिल गोटे यांचे पोलिसाना उद्देशून वक्तव्य निषेधार्ह असून त्यांच्या वक्तव्याची चौकशी करून गृहमंत्र्यांनी कारवाई करावी असही मुश्रीफ यांनी म्हटलं आहे