मुंबई – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने एक चकीत करणारी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने यंदा भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. विराट कोहली म्हणाला भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषक जिंकण्यासाठी इंग्लडचा सघ प्रबळ दावेदार आहे.
विराट कोहलीने इंग्लडविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत ही प्रतिक्रिया दिली. त्याच्या मते सद्याच्या घडीला टी-२० प्रकारात इंग्लडचा संघ सर्वात घातक आहे. तसेच टी-२० क्रिकेटमधील आवडता संघ म्हणून भारतीय संघाचा उल्लेख केला नाही.
विराट कोहली म्हणाला, ”मला वाटत नाही की, भारत टी-२० विश्वचषकासाठी आवडीचा संघ आहे. माझ्या मते इंग्लडचा संघ असा असेल ज्यांचा पराभव करणे अवघड राहील. ते सद्या अव्वल क्रमांकावर आहे आणि त्यामुळे पुर्ण लक्ष त्यांच्यावर असणार आहे.इतर सर्व संघ या गोष्टीवर अवलंबून असतील की त्यांची ताकद काय आहे.जे मी सांगत आहे त्याच्याशी इतर सर्व संघ सहमत असतील. इंग्लडचा संघ टी-२० विश्वचषक जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार आहेत.”
भारतीय संघाला विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आयसीसीच्या एकाही स्पर्धेत विजेतेपद पटकावता आलेले नाही. त्यामुळे यंदा हा टी-२० विश्वचषक जिंकण्यासाठी विराटसेना निर्धारानेच मैदानीात उतरेल. विराट कोहलीच्या दृष्टीने ही सुवर्णसंधी असणार आहे. त्याचबरोबर ही स्पर्धा भारतात होणार असल्याने विराटसेना याचा पुरेपुर फायदा घेण्याच्या तयारीत असेल.
तत्पुर्वी आज संध्याकाळी अहमदाबाद येथे टी-२० मालिकेतील पहिला सामना खेळला जाणार आहे. या सामन्याला नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी सात वाजता सुरुवात होणार आहे.