लाहोर – भारतात होत असलेली आगामी टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा अमिरातीत खेळवण्यात यावी, अशी मागणी पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष एहसान मणी यांनी केली आहे.
क्रिकेट जगतातील अव्वल तीन राष्ट्रांच्या मानसिकतेत बदलाची नितांत आवश्यकता आहे, अशी भूमिका मणी यांनी आयसीसीकडे व्यक्त केली आहे.
आम्हाला फक्त संघासाठीच नव्हे, तर चाहते, पदाधिकारी आणि पत्रकारांसाठीही व्हिसाची हमी हवी.
मार्चच्या अखेरपर्यंत आम्हाला लिखित स्वरुपात ही हमी हवी, असे मणी यांनी सांगितले. मणी यांनी भारतीय क्रिकेट मंडळाकडून सुरक्षा व्यवस्थेबाबतही लिखित हमी मागितली आहे.