झलवर – राजस्थानमधील झलवर जिल्ह्यातील राडी गावात अनेक कावळ्यांचा बर्ड फ्ल्यूने मृत्यू झाला. त्यामुळे या भागात जमावबंदीचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिला. या प्रकाराची तपासणी करण्यासाठी शिघ्र प्रतिसाद दलाची स्थापना करून नमुने गोळा करून चौकशी सुरू करण्यात आली आहे. नमुने पोल्ट्री फॉर्म आणि चिकनच्या दुकानातून गोळा केल्यानंतर ती बंद करण्यात आली आहेत.
जर या पक्षांना बर्ड फ्यू झाल्याचे निष्पन्न झाले तर सर्व कोंबड्या मारून टाकण्यात येतील. त्याची योग्य ती नुकसानभरपाई देण्यात येईल, असे झलवरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
बर्ड फ्ल्यू एव्हिएन एन्फूएन्झा टाईप एक विषाणूमुळे होतो. जगभरात जंगली पक्षांमुळे त्याचा प्रसार होतो. त्यामुळे पाळीव पक्षी आणि प्राण्यांना त्याची बाधा होऊ शकते. त्याची मानवाला सहसा लागण होत नाही. मात्र काही वेळा मानवी संसर्गाची उदाहरणे पहायला मिळाली आहेत.