कोल्हापूर – भाजप आणि शिवसेना यांना एकत्र येऊन सरकार बनवण्याचा कौल जनतेने दिला होता मात्र शिवसेनेच्या महत्वाकांक्षीपायी ज्यांचे विचार वेगळे आहेत असे तीन पक्ष एकत्र आले.
एका वाक्यात गोंधळलेले सरकार, संवेदनशीलता नसलेले सरकार, करोनात अपयशी ठरलेले सरकार अशा अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महा विकास आघाडी सरकार वरती टीका केली. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
मराठा आरक्षणात यांनी काहीही केले नाही, ओबीसीला अस्वस्थत करून ठेवले. समाज समाजात तेढ वाढवण्याचे काम केले. कृषी क्षेत्रात बोंबाबोंब, कुणालाही काहीही मदत नाही, शेतकऱ्यांवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ महिलांवर अत्याचार वाढले.
साध्या फेरीवाल्यांना सुद्धा यांनी काही दिले नाही घरकाम करणाऱ्या नागरिकांना काहीही मदत केली नाही आर्थिक संकट असल्याचे कायम सांगायचे असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
केंद्राने जीएसटी दिला नाही हे सांगितले जाते आहे. मात्र या राज्यात कुणीही समाधानी नाही. मोदी देखील म्हणतील ‘इनको चलना नहीं आता तो सरकार बनया क्यूँ’ असे देखील चंद्रकांत पाटील म्हणाले.