नवी दिल्ली : मुंबई -भुवनेश्वर लोकमान्य टिळक टर्मिन्स एक्स्प्रेसचे जवळपास 7 डब्बे रूळावरून घसरले आहेत. सकाळी सातवाजेच्या सुमारास ही घटना कटक येथील नेरगुंडी रेल्वेस्थानकाजवळ घडली आहे. यामध्ये 40 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
Odisha: Seven coaches derailed and several people injured after Lokmanya Tilak Express hits a guard van of a goods train near Salagaon at about 7 am today. pic.twitter.com/5w6xRXOzF7
— ANI (@ANI) January 16, 2020
रेल्वेचे डब्बे रूळावरू घसरण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र दाट धुक्यांमुळे ही घटना घडली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दुर्घटनेबाबत माहिती मिळाताच घटनास्थळी मदतकार्य सुरू झाले आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयांमध्ये हलवले जात आहे.