जळोची- मंत्रालय आणि विधान भवन परिसरात चार शेतकऱ्यांनी विविध मार्गाने आत्महत्येचा प्रयत्न केला. याबाबत बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की,हे ईडी सरकार सत्ता कशी मिळेल यासाठी साम दाम दंड भेद वापरून “50 खोके ऑल ओके” वाले हे सरकार सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी आले नाही..त्यांनी सत्ता ओरबडून आणली आहे. दुर्दैवाने यात महाराष्ट्रातील जनता भरडली जात आहे. अशी खरमरीत टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
खासदार सुळे आज बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी पत्रकारांची संवाद साधला. दरम्यन, काल विधाभवन परिसरात अगोदर सुभाष देशमुख या शेतकऱ्याने अंगावर रॉकेट घेऊन स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एका 88 वर्षीय शेतकऱ्याने पोलिसांना धमकी देत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर एका शेतकरी महिलेने सुद्धा स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे आता या शेतकऱ्याने थेट शोले स्टाईल आंदोलन करत मंत्रालयाचे टेरेस गाठले.
महागाईच्या प्रश्नावर बोलताना सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्रातील जनता महागाईने भरडली जात आहे. या मूलभूत आव्हानांना बगल देण्यासाठी भाजप मोठी खेळी खेळत आहे.मूळ प्रश्न सोडून इतर गोष्टीत जनतेला गुंतवले जात आहे.महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर बोलताना खासदार सुळे म्हणाल्या की, जनतेच्या मानसिकतेचा विचार करून सर्वांनी काम केले पाहिजे पुणे विभागाचे एसपी या भागात चांगले काम करत आहेत.भरारी पथके वाढवली आहेत. निर्भया पथक कार्यरत आहे. महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी हा सामाजिक प्रश्न म्हणून सर्वांनी मिळून एकत्रित प्रयत्न केले पाहिजे.