कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या 24 तासात पासून अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडत असल्याने पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे राधानगरी राधानगरी धरणाचे स्वयंचलित 5 दरवाजे उघडले असून धरणातून 8540 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
त्यामुळे कोल्हापुरातील पंचगंगा, भोगावती नदीच्या पाणीपातळी झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी आज सकाळी 7 वाजता 26.8 फूट असून 32 बंधारे पाण्याखाली आहेत. राधानगरी धरणात आज अखेर 8.35 टीएमसी पाणीसाठा आहे. जंगमहट्टी, घटप्रभा कोदे लघुप्रकल्प, पाटगाव, चिकोत्रा, कासारी व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.