कायद्याच्या हेतूंचा विचार न्यायालयाच्या कक्षेत नाही
अलाहाबाद – संसदेने संमत केलेल्या कायद्यामागील हेतूंचा विचार करणे हे न्यायालयाच्या कक्षेच्या बाहेर आहे, असे विधान पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे वकील खरे यांनी आपल्या भाषणाच्या अखेरच्या दिवशी अलाहाबाद हायकोर्टात केले.
व्यक्तीव्यक्तींतील भेदभाव नष्ट करा
सिन्नर – व्यक्तीव्यक्तीमध्ये भेदभाव निर्माण करणाऱ्या सामाजिक विषमतेच्या भिंती पाडून टाका, असे आवाहन प्रा. ललित समनोत्रा यांनी अस्पृश्यता निवारण सभेत केले. “एक गाव एक पाणवठा’ हा कार्यक्रम यावेळी ठरला.
पुस्तक ही स्वतंत्र प्रक्रिया
पुणे – वेदांतात प्रत्येक क्रियेमागे जानाति, इच्छति व यवत या तीन उपक्रिया सांगितलेल्या आहेत. त्याच लेखन क्रियेमागेही असाव्यात. प्रत्येक लेखकाची लेखन प्रसूती क्रिया वेगवेगळी असते तशीच प्रत्येक पुस्तकांची निर्मितीही स्वतंत्र असते. प्रत्येक पुस्तक ही स्वतंत्र प्रक्रिया आहे. स्वतंत्र तंत्र आहे आणि ते लेखकाने केलेल्या अथवा परिश्रमामुळे आकारास येत असते, असे विचार साहित्यिक गो. नी. दांडेकर यांनी व्यक्त केले.
हरिजनांना पाणी पुरवठा व्हावा
लातूर – पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने हरिजनांचे आतोनात हाल होत आहेत, त्यांना पाणीपुरवठा व्हावा, असे मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले.