नवी दिल्ली – काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे ( Mallikarjun kharge ) यांनी शुक्रवारी देशातील दलित आणि आदिवासींवरील वाढत्या अत्याचारांच्या प्रकरणांवरून मोदी सरकारवर ( Modi sarkar ) निशाणा साधला. समाजात फूट पाडण्याच्या भाजपच्या अजेंड्याचाच हा भाग असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
त्यांनी एक्सवरील एका पोस्ट मध्ये म्हटले आहे की, नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या ताज्या अहवालातील आकडेवारीवरून दलित आणि अदिवासींवरील अत्याचाराची कहाणी समोर आली आहे. ही केवळ आकडेवारी नाही, तर दलित आणि अदिवासी समुदायाचे जीवन असुरक्षित बनवण्याचे भाजपचे रेकॉर्डच स्पष्ट करणार हा अहवाल आहे. ( Congress vs bjp)
अन्याय, अत्याचार आणि दडपशाही हा गेल्या दशकात समाजात फूट पाडण्याच्या भाजपच्या कटचाच अजेंडा आहे असे त्यांनी म्हटले आहे. दलित-आदिवासींवर सातत्याने होत असलेल्या अत्याचारामुळे भाजप-आरएसएसचा ढोंगीपणा उघड होतो, असा आरोप काँग्रेस प्रमुखांनी केला.
२०१३ पासून दलितांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये ४६.११ टक्के आणि आदिवासींविरुद्ध ४८.११ टक्के वाढ झाल्याचा दावा खर्गे यांनी या अहवालातील माहितीवरून दिला आहे.