नवी दिल्ली – देशभरातील तुरूंगात 31 डिसेंबर 2021 पर्यंतच्या आकडेवारीनुसार एकूण 4 लाख 27 हजार कच्चे केैदी आहेत. त्यांच्यावरील खटल्यांचा निकाल प्रलंबीत असल्याने त्यांना कारागृहातच राहावे लागत आहे अशी माहिती आज लोकसभेत एका लेखी उत्तरात देण्यात आली. ज्यांच्यावरील खटल्याचा निकाल लागायचा आहे पण ज्यांना तुरूंगात ठेवण्यात आले आहे अशा कैद्यांना कच्चे केैदी किंवा अंडरट्रायल कैदी असे संबोधले जाते.
केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, गेल्या काही वर्षांमध्ये कारागृहातील कच्चा कैद्यांची संख्या वाढली आहे. 31 डिसेंबर 2014 रोजी देशात एकूण 2,82,879 कच्चे केैदी होते त्यांची संख्या 31 डिसेंबर 2021 रोजी 4,27,167 इतकी झाली आहे. यात 90,037 अनुसूचित जातीचे , 42,211 कैदी अनुसूचित जमातीचे होते आणि 1,51,287 कैदी इतर मागासवर्गीय समाजाचे आहेत अशी माहितीही त्यांनी दिली.