मुंबई – लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली असून राज्यात 341 गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली. टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये ज्या 341 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी 14 गुन्हे अदखलपात्र आहेत.
यामध्ये बीड 30, पुणे ग्रामीण 27, जळगाव 26, मुंबई 21, कोल्हापूर 16, सांगली 12, नाशिक ग्रामीण 12, बुलढाणा 12, नाशिक शहर 11, जालना 11, सातारा 10, लातूर 10, नांदेड 9, पालघर 9, ठाणे शहर 8, परभणी 8, नवी मुंबई 8, सिंधुदूर्ग 7, अमरावती 7, ठाणे ग्रामीण 7, नागपूर शहर 7, हिंगोली 6, गोंदिया 5, सोलापूर ग्रामीण 5, पुणे शहर 4, रत्नागिरी 4 ,सोलापूर शहर 4, नागपूर ग्रामीण 4, भंडारा 4, चंद्रपूर 3, पिंपरी- चिंचवड 3, रायगड 2, धुळे 2, वाशिम 2, औरंगाबाद 1 (एन.सी), यवतमाळ 1 यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हॉट्सप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी 141 गुन्हे दाखल झाले आहेत, तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी 129 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
…………………………..