नवी दिल्ली – गेल्या सात वर्षाच्या काळात 5 ते 12 वर्षाच्या वयोगटातील बालकांना रेल्वेने फूल तिकीट (full ticket to child )लागू केल्याने त्यातून रेल्वेला (Indian Railway) 2800 कोटी रूपयांचा जादाचा महसुल ( Revenue of Railways) मिळाला असल्याची माहिती माहितीच्या अधिकारात मिळाली आहे.
21 एप्रिल 2016 पासून हा नवीन निर्णय रेल्वेने लागू केला आहे. त्यानुसार 5 ते 12 वयोगटातील बालकांनी स्वतंत्र सीट किंवा बर्थ वापरली तर त्यांना पुर्ण तिकीट दर लागू करण्यात आला. या आधी या बालकांना स्वतंत्र सीट किंवा बर्थ वापरली तरी केवळ निम्मे भाडेच आकारले जात होते, परंतु आता पुर्ण भाडे द्यावे लागत आहे. (Indian Railway Ticket)
त्याद्वारे रेल्वेने बाल प्रवास भाडे नियमांमध्ये सुधारणा करून गेल्या सात वर्षांत बाल प्रवाशांकडून 2,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त अतिरिक्त महसूल मिळवला आहे, असे आरटीआयच्या उत्तरात आढळून आले आहे. सन 2022-23 या एका वर्षातच रेल्वेला त्यातून 560 कोटी रूपयांचा अतिरीक्त महसुल मिळाला आहे. सुधारित नियमानुसार या वयोगटातील मुलांना अर्ध्या भाड्याने प्रवास करण्याची परवानगी दिली असली तरी, त्यांना स्वतंत्र बर्थ किंवा जागा मिळत नाही आणि ते ज्या प्रौढ व्यक्तीसोबत प्रवास करत आहेत त्यांच्या सीटवर त्यांना बसवावे लागते.
आकडेवारी दर्शवते की या सात वर्षांत 3.6 कोटींहून अधिक मुलांनी स्वतंत्र आरक्षित सीट किंवा कोच न निवडता अर्धे भाडे देऊन प्रवास केला. तर दुसरीकडे, 10 कोटींहून अधिक मुलांनी स्वतंत्र बर्थ/आसन निवडले आणि पूर्ण भाडे दिले.