नवी दिल्ली- सध्या ऑनलाईन शिक्षणाचा जोरदार पाठपुरावा केला जात असला, तरी या ऑनलाईन वर्गांना उपस्थित राहण्यासाठी किमान 27 टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन अथवा लॅपटॉप नाहीत. तर 28 टक्के विद्यार्थी आणि पालकांना खंडीत वीजपुरवठ्याचा अडथळा आहे, असे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अर्थात “एनसीईआरटी’ने केलेल्या सर्वेक्षणामध्ये पुढे आले आहे.
या सर्वेक्षणामध्ये केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय आणि सीबीएसईशी संबंधित 34 हजार विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शाळांच्या मुख्याध्यापकांकडून माहिती घेण्यात आली होती.
इलेक्ट्रॉनिक माध्यमांची योग्य हाताळणी कशी करायची, याबाबतचे अज्ञान असल्यामुळे शिक्षकांना ऑनलाइन शिक्षण देण्याची पद्धती पुरेशी अवगत झालेली नाही. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये अडथळे येत आहेत.
* सर्वसाधारणपणे 27 टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन, लॅपटॉप नाही.
*36 टक्के विद्यार्थी पाठ्यपुस्तके आणि अन्य पुस्तके वापरतात. डिजिटल शिक्षणासाठीचे माध्यम म्हणून मोबाइलला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते.
* शिक्षक आणि मुख्याध्यापकांकडून लॅपटॉप वापरण्यास दुसऱ्या क्रमांकाचे प्राधान्य दिले जाते.
* रेडिओ आणि टिव्हीला सर्वात कमी प्राधान्य दिले जाते.
* विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये थेट संवादच होऊ शकत नसल्याचे बहुतेक संबंधितांनी सांगितले.
गणित विषय शिकवणे सगळ्यांत अवघड
विद्यार्थ्यांना आतापर्यंत पुस्तकांची सवय होती. त्यामुळे “एनसीईआरटी’च्या वेबसाईटवरील माहिती मिळवण्यात त्यांना
अडचणी येत अहेत. या ई बुकचा वापर कसा करायचा याचे तंत्र अवगत नसल्याने विद्यार्थी-शिक्षकंमध्ये संवादच होत नसल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे. ऑनलाइन शिक्षणामध्ये गणित शिकवणेच सर्वात अवघड जाते, असे बहुतेकांचे म्हणणे आहे. त्यानंतर विज्ञान आणि फार कमी जणांना सामाजिक विज्ञान शिकवण्यात अडचणी येत आहेत. 17 टक्के विद्यार्थ्यांना भाष शिकणे आवघड जाते. शाळेच्या निमित्ताने होणारी विद्यार्थ्यांची शारीरिक हालचाल महत्वाची असल्याचे अनेक पालकांचे म्हणणे आहे.
करोनाच्या साथीमुळे केंद्र सरकारच्या आदेशानुसार 16 मार्चपासून देशातील विद्यापीठे आणि शाळा बंद आहेत. 25 मार्चपासून सरकारने लॉकडऊन जाहीर केला आहे.