नवी दिल्ली – मोदी सरकारने पुढील पाच वर्षात देशातील पोलिस दलांच्या आधुनिकीकरणासाठी 26,275 कोटी खर्च करायचे ठरवले असून त्या आधारे पोलिस दलांच्या आधुनिकीकरणाची मोहीम सुरू ठेवली जाणार आहे. या मोहीमेत जम्मू काश्मीर आणि ईशान्येकडील राज्ये तसेच नक्षलप्रभावित राज्यांच्या पोलिस दलांना आधुनिक सुरक्षा यंत्रणा पुरवली जाणार आहे.
या योजनेत देशात एक मजबूत फॉरेन्सिक सेटअप विकसित करून अंमली पदार्थ नियंत्रण आणि गुन्हेगारी न्याय प्रणाली मजबूत करण्यासाठी राज्यांना मदत केली जाईल.जम्मू आणि काश्मीर, ईशान्येकडील राज्ये आणि नक्षल प्रभावित भागात सुरक्षा-संबंधित खर्चासाठी 18,839 कोटी रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आला आहे.राज्य पोलिस दलांच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारकडून 4,846 रुपये दिले जाणार आहेत.