नवी दिल्ली – शुक्रवारी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत रिझर्व्ह बँकेने 2000 च्या नोटा परत करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच आता हळूहळू दोन हजाराच्या नोटा चलनातून बाहेर पडणार आहेत. त्याची तारीख RBI ने 30 सप्टेंबर 2023 निश्चित केली आहे. या तारखेपर्यंत बँकांमधून या नोटा बदलून घेता येणार आहेत.
दरम्यान, RBI च्या या निर्णयावर राजकारणी, धोरणकर्ते आणि तज्ज्ञांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अश्यातच, आता त्यावर तृणमूलच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिल्याचं दिसत आहे. त्यांनी एक ट्विट शेअर करत या निर्णयावर आपलं मत व्यक्त केलं आहे.
नेमकं ममता बॅनर्जी आपल्या ट्विटमध्ये काय म्हणाल्या….
Another whimsical & Tughlaqi demonetisation drama of Rs.2000 notes will hit the common people hard once again by subjecting them to massive harassment. These imperious measures are meant to camouflage the fundamentally anti-people & crony capitalist nature of this regime. Such…
— Mamata Banerjee (@MamataOfficial) May 20, 2023
त्या म्हणतात… “2000 रुपयांच्या नोटांचं आणखी एक लहरी आणि तुघलकी नोटाबंदीचं नाटक. रिजर्व्ह बँकेच्या निर्णयामुळे सामान्य लोकांना पुन्हा एकदा प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागणार आहे. असे मोदी सरकारचे निर्णय हे जनतेच्या विरोधातील आहेत. जनता हे सगळं अशी हुकूमशाही लोक विसरणार नाहीत’, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.