मुंबई – भिवंडीमध्ये काॅंग्रेसला धक्का बसला आहे. येथील तब्बल 18 नगरसेवकांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केलाय. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये हा प्रवेश सोहळा पार पडला.
भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीपासून काॅंग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू होता. याच वादातून आता काॅंग्रेसच्या 18 नगरसेवकांनी काॅंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे सांगण्यात येत आहे.
रा.म.काँ प्रदेशाध्यक्ष @ChakankarSpeaks व माजी आ. रमेश थोरात यांच्या पुढाकाराने तात्यासाहेब ताम्हाणे,पोपटराव बोराटे,चंद्रकांत कारंडे,दादासो भिसे,जनार्दन सोनवणे,प्रकाश टिळेकर,अशोकराव बोराटे,संतोष जाधव,शिवराम ताम्हाणे,आतिष बोराटे,सतिश खुने,बिभिषण खुने,संतोष ढोरले यांचा प्रवेश झाला. pic.twitter.com/As5snkrKRy
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) December 23, 2020
महाविकास आघाडीत अंतर्गत वाद होऊ नये म्हणून सुरूवातीला शरद पवार यांनी त्यांच्या प्रवेशाला नकार दर्शवला होता. मात्र, अखेर या नगरसेवकांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. @ChhaganCBhujbal,कामगार मंत्री ना. @Dwalsepatil, खा. @supriya_sule, गृहमंत्री ना. @AnilDeshmukhNCP, आरोग्यमंत्री ना. @rajeshtope11, अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. @DrShingnespeaks, सामाजिक न्याय मंत्री ना. @dhananjay_munde उपस्थित होते. pic.twitter.com/jMfYr81yQa
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) December 23, 2020
भिवंडीतील काॅंग्रेसच्या नगरसेवकांसह आज दौंड येथील रासपच्याही काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटरवरून माहिती देण्यात आली आहे. या प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे बळ वाढले आहे. मात्र यामुळे महाविकास आघाडीत वाद होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.