नवी दिल्ली – सन 2022 या वर्षात राष्ट्रीय राजधानीत आगीच्या एकूण 16,500 हून अधिक घटना घडल्या आहेत. ज्यात वर्षभरात 82 जणांचा मृत्यू, तर 700हून अधिक लोक जखमी झाले, असे दिल्ली अग्निशमन सेवेने सांगितले. शहराच्या अग्निशमन सेवेला 2022मध्ये आगीशी संबंधित 16,518 कॉल आले होते. त्यापैकी 722 गैर-प्राणघातक, तर 82 प्राणघातक होते.
उत्तर प्रदेशच्या 80 जागा जिंकणार; भाजप ऍक्शन मोडमध्ये
यापैकी बहुतांश आगीच्या घटना कारखाने, व्यावसायिक इमारती आणि झोपडपट्ट्यांमध्ये घडल्या. असे आढळून आले आहे की यापैकी अनेक कारखाने आणि व्यावसायिक जागा जिथे आग लागल्याची नोंद झाली आहे त्यांच्याकडे अग्निशमन विभागाचे “ना हरकत प्रमाणपत्र” नव्हते किंवा त्यांच्या अग्नि-सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित नव्हत्या, असे अग्निशमन दलाच्या प्रमुखांनी सांगितले.
विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला
एकूण कॉलपैकी, जास्तीत जास्त कॉल्स उन्हाळ्याच्या हंगामात एप्रिल ते जून दरम्यान प्राप्त झाले होते. तर हिवाळ्यात अशा कमी घटनांची नोंद झाली होती. मार्चमध्ये ईशान्य दिल्लीच्या गोकुळपुरी भागात पहाटेच्या सुमारास झोपड्यांना आग लागून सात जणांचा मृत्यू झाला होता. या आगीत बाधित एकूण 60 झोपड्यांपैकी तीस झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. गेल्या वर्षी 14 मे रोजी बाहेरील दिल्लीतील मुंडका येथे एका चार मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 27 लोक ठार आणि 12 जखमी झाले होते.