नगर -प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत हवामानावर आधारीत फळपीक विमा योजनेचा लाभ मिळावा म्हणून दाखल केलेल्या प्रस्तावांना प्रशासकीय स्तरावर मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातील 1 हजार 546 फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना दोन कोटी 72 लाख रूपयांचा लाभ मिळाला असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.
हवामानातील बदलांचा मोठा परिणाम फळबागांवर होतो. होणाऱ्या नुकसानीची भरपाई म्हणून केंद्र सरकारने हवामानावर आधारीत पंतप्रधान फळ पीक विमा योजनेची सुरूवात करून फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू केला. नगर जिल्ह्यात झालेल्या वादळीवाऱ्यासह झालेला पाऊस, अतिवृष्टी आणि नैसर्गिक बदलांचा विपरीत परिणाम द्राक्ष आणि डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर अर्थिक नूकसान झाले होते.
हवामावर आधारीत पंतप्रधान फळ पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या नूकसान भरपाई मिळावी म्हणून कृषि विभागाने याबातचा प्रस्ताव शासनाला सादर केला होता. याबाबत प्रशासकीय स्तरावर केलेल्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील 1 हजार 546 शेतकऱ्यांना 2 कोटी 72 लाख रूपयांचे अनुदान मंजूर झाले असल्याचे खा. डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.
जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील 30 शेतकऱ्यांना 14 लाख 45 हजार नगर तालुक्यातील 74 शेतकऱ्यांना 10 लाख 11 हजार पारनेर मधील 27 शेतकऱ्यांना 2लाख 71 हजार,पाथर्डी मधील 1हजार 15 शेतकऱ्यांना 92 लाख 68 हजार,राहुरीतील एकमेव शेतकऱ्याला 42 हजार 848 शेवगाव मधील 78 शेतकऱ्यांना 12लाख 55हजार श्रीगोंदा तालुक्यातील 38 शेतकऱ्यांना 4लाख 51 हजार राहाता तालुक्यातील 115 शेतकऱ्यांना 37 लाख 78 हजार संगमनेर तालुक्यातील 69 शेतकऱ्यांना 6लाख 14 हजार,
कोपरगाव तालुक्यातील 63 शेतकऱ्यांना 10लाख 55हजार नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना 25 शेतकऱ्यांना 6लाख 25हजार, श्रीरामपूर तालुक्यातील 11 शेतकऱ्यांना 2 लाख 64 हजार रूपयांचे विमा अनुदान मंजूर झाल्याने अर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.