नवी दिल्ली : देशात २०२३ मध्ये सायबर फसवणुकीचे ११.३ लाख गुन्हे दाखल झाले आहेत. यात एकूण ७,४८९ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. फसवणुकीच्या रकमेबाबत महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे. राज्यात सर्वाधिक ९९०.७ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती उघड झाली आहे.
संख्येच्या हिशेबाने फसवणुकीचे सर्वाधिक दोन लाख गुन्हे उत्तर प्रदेशात दाखल आहेत. मात्र, हे आकडे लोकसंख्येच्या प्रमाणात पाहिल्यास चित्र पूर्ण बदलते. २०२३ मध्ये दिल्लीत दर १० लाखांपैकी ३५२ लोकांची सायबर फसवणूक झाली. दिल्लीनंतर हरियाणा व तेलंगणाचा क्रम लागतो.
ही माहिती लोकसभेत सादर इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटरच्या अहवालातून मिळाली. त्यानुसार ४.७ लाख तक्रारदारांना १,२०० कोटी परत मिळाले. त्यांनी फसवणुकीनंतर लगेच तक्रार केली होती. देशात २०२२ मध्ये एकूण १४ लाख गुन्हे दाखल करण्यात आले होते. २०२१ मध्ये १४.०२ लाख होते. २०२३ मध्ये हा आकडा ११.३ लाख इतकाच आहे.
या राज्यांमध्ये फसवणूक कमी
(गुन्हे/१० लाख लोक)
आसामः२४
प. बंगालः३२
झारखंडः३१
आंध्र प्रदेशः४०
ओडिशाः४०
बिहारः४०
मध्य प्रदेशः५१
या राज्यांत सर्वांत जास्त फसवणूक
(गुन्हे/१० लाख लोक)
दिल्लीः३५२
हरियाणाः३०३
तेलंगणः२०४
गुजरातः२०२
उत्तराखंडः१८०
महाराष्ट्रः१११
राजस्थानः११४
सर्वाधिक फसवणूक(कोटींमध्ये)
महाराष्ट्रः ९९०.७
तेलंगणः ७५९.१
उत्तर प्रदेशः ७२१.१
कर्नाटकः ६६२.१
तामिळनाडूः ६६१.२