मुंबई – नव्या तंत्रज्ञानावर आधारित नव्या युगातील कंपन्या म्हणजे स्टार्टअप्ची संख्या भारतात वेगाने वाढत आहे. 2022 च्या अखेरपर्यंत भारतातील युनिकॉर्न कंपन्यांची संख्या 100 पेक्षा जास्त होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. ज्या कंपन्यांचे बाजारमूल्य एक अब्ज डॉलरपेक्षा जास्त असते म्हणजे 8 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असते अशा कंपन्यांना यूनिकॉर्न असे समजले जाते. सध्या भारतातील स्टार्टअप्चे संख्या 68 इतकी आहे.
आणखी 50 कंपन्या युनिकॉर्न होण्याच्या दिशेने मार्गाक्रमण करीत असल्याचे पीडब्ल्यूसी इंडिया या संस्थेने तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे. ऑक्टोबर -डिसेंबर दरम्यान भारतातील स्टार्टअप्मध्ये देश-विदेशातून दहा अब्ज डॉलर इतकी गुंतवणूक झाली आहे. भारत सरकारने आणि राज्य सरकारने नव्या कंपन्यांना उत्तेजन दिले आहे.
यासंदर्भात देशपतळीवर एक स्पर्धा आयोजित करण्यात येते. भारतामध्ये नव्या कंपन्या स्थापन झाल्यानंतर भारत आधुनिक अर्थव्यवस्थात स्वतःचे स्थान बळकट करू शकेल असे सरकारला वाटते. सध्या स्टार्ट अप्मध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिका पहिल्या क्रमांकावर तर चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे.