न्युयॉर्क : भारताला मोठा सागरी किनारा लाभला आहे. ज्यावर मुंबई, सूरत, चेन्नई आणि कोलकाता ही चार महत्त्वाची शहर वसलेली आहेत. पण आता या चारही महत्त्वाच्या शहरांना नैसर्गिक धोका निर्माण झाला आहे. कारण की येथील असणाऱ्या समुद्रातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या शतकाच्या शेवटापर्यंत हिमालयाचे ग्लेशियर वितळून समुद्रातील पाण्याची पातळी प्रचंड वाढेल. ज्याचा थेट परिणाम हा समुद्र किनारी असणाऱ्या शहरांवर होणार आहे.
नुकतेच संयुक्त राष्ट्राच्या एका संस्थेने वातावरण बदलावर सुरु असलेल्या चर्चेदरम्यावर या विषयाकडे लक्ष वेधले. यूएन समितीच्या मते, समुद्रातील पाण्याची पातळी प्रचंड वेगाने वाढत आहे. गेल्शिअर सतत वितळत असल्याने समुद्रातील पाण्याची पातळी 2100 पर्यंत तब्बल 1 मीटरने वाढणार आहे. जे जास्त धोकादायक समजले जात आहे.
रिपोर्टनुसार, याचा परिणाम जगभरातील 1.4 अब्ज लोकांवर होईल. बुधवारी इंटरगवर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज यांच्याद्वारे ‘ओशियन अँड क्रायोस्फीयर’ यावर आधारित एका रिपोर्टमध्ये ही गोष्ट सांगण्यात आली. जगातील 45 किनार्यावरील शहरांमध्ये 4 भारतीय शहरे आहेत जिथे समुद्राची पातळी 50 सेंटीमीटरपर्यंत वाढण्याच्या मार्गावर आहे. बुधवारी आयपीसीसीने प्रसिद्ध केलेल्या अहवालात असेही म्हटले आहे की समुद्राच्या पातळीत वाढ झाल्याने किनारपट्टीवरचे जीवन पूर्णपणे संपून जाईल.
1982 पासून 2016 दरम्यान, सागरी किनाऱ्यावरी तापमानातही दुप्पटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे आणि आता त्याच्या पातळीत सतत वाढत आहे. जवळजवळ 7000 हजार रिसर्च पेपरद्वारे तयार करण्यात आलेल्या या रिपोर्टनुसार, वेगाने वितळणारा बर्फ हा या शतकाच्या शेवटापर्यंत समुद्राचा जलस्तर 30 ते 60 सेमीपर्यंत वाढत जाईल. यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचा धोका वेगाने वाढत जाईल.