वाल्हे- केंद्र सरकारच्या वतीने कलम 370 व कलम अ 35 हटविण्यात आल्याने वाल्हे (ता. पुरंदर) येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी वाल्हे येथील गांधी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. तसेच फटाके फोडून, पेढे वाटून सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले.
या प्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष सचिन लंबाते, ऍड. दशरथ घोरपडे, ग्रामपंचायत सदस्य कांतीलाल पवार, चंद्रकांत सासवडे, कुंडलिक पवार, सचिन दोशी, प्रशांत दोशी, जावेद शेख, राजेंद्र ढवळे, जितेंद्र शहा, समदास राऊत, अक्षय खुडे, प्रशांत भुजबळ, श्रीराम पवार, सुनिल राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.