रशिया,चीनसोबतच्यानवी दिल्ली : चीनशी झालेल्या संघर्षानंतरही भारताने भारत, चीन आणि रशिया यांच्यातील व्हर्च्युअल बैठकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. पराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वतीने ही माहिती देण्यात आली. सीमेवर शांतता नांदावी यासाठी मतभेद चर्चेने सोडवण्याची आमची भूमिका आम्ही कायम ठेवू. त्याचवेळी पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही भारताच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहोत, असे या मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
या बैठकीत भारत आणि चीनमधील द्विपक्षीय संबंधांबाबत चर्चा होणार नसल्याचे चीनने बुधवारी स्पष्ट केले होते. त्यामुळे या चर्चेतून भारत या चर्चेतून बाहेर पडेल अशी अटकळ बांधली जात होती.