ढाका – बांग्लाबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या जीवनावर आणि बांगलादेशच्या स्वातंत्र्य या विषयावर आधारलेली पुस्तके सोमवारी बांगलादेशातील भारतीय उच्चायुक्तांनी देशातील 100 विद्यापीठे व महाविद्यालयांना भेट दिली.
ढाका, छट्टोग्राम, खुलना, राजशाही आणि सिल्हेट अशा ठिकाणच्या विद्यापिठांना आणि महाविद्यालयांना ही पुस्तके भेट देण्यात आली. ही पुस्तके प्रतिष्ठित लेखक व इतिहासकारांनी लिहिली आहेत, असे भारतीय उच्चायुक्तांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकमध्ये म्हटले आहे.
बांगलादेशचे संस्थापक अध्यक्ष शेख मुजीबुर रहमान यांचे जन्मशताब्दी वर्ष “मुजीब बार्शो’चा एक भाग म्हणून भारतीय उच्चायुक्तालयाने पुस्तके भेट देण्यासाठीच्या ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या उपक्रमासाठी पुढाकार घेतल्याबद्दल बांगलादेश सरकारचे शिक्षणमंत्री बॅरिस्टर मोहिबुल हसन चौधरी यांनी भारतीय उच्चायोगाचे आभार मानले आणि भारत बांगलादेश संबंधांच्या पुनरुच्चार केला.
आधुनिक बांगलादेशचे संस्थापक आणि 20 व्या शतकातील सर्वात प्रभावशाली आणि धैर्यशील नेते अशा शब्दात भारतीय उच्चायुक्त रिवा गांगुली दास यांनी बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांचे वर्णन केले. भारत-बांग्लादेश संबंधांचा पाया बंगबंधूंनी घातला, असेही दास म्हणाल्या.