पुणे- “राज्यातील गाडकिल्ले हा आपल्या परंपरेचा एक ऐतिहासिक ठेवा आहे. आज तरूणाई मोठ्या प्रमाणावर दुर्गसंवर्धनात काम करते, मात्र या कार्याला एक व्यापक स्वरूप वायला हवे, महाराजांच्या विचारांचा प्रसार, बहकिल्ल्यांवरील स्वच्छता व संवर्धन हीच खरी शिवशक्ती’ असे मत आमदार रोहीत पवार यांनी पुण्यात व्यक्त व्यक्त केले.
सृजन संस्थेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय दुर्गराज गडकिल्ले बांधणी स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभात ते बोलत होते. दुर्ग अभ्यासक व लेखक रामनाथ आंबेरकर आणि संवर्धन अभ्यासक मृदूला माने तसेच ज्येष्ठ पस्मार जतीन देसाई, प्रकाश अकोलकर, स्पर्धेचे परिक्षक प्रमोद बोऱ्हाडे यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसा निमित्ताने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातील 30 जिल्ह्यांमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत 10 हजार हून अधिक स्पर्धकांनी तर 300 मित्र मंडळांनी सहभाग घेतला होता. युवांमध्ये असलेली संघटन शक्ती व सकारात्मकता निर्माण व्हावी तसेच लॉकडाऊन मध्ये घरी असलेल्या विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी या सोबतच आपल्या सांस्कृतीक वारसा जोपासण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली होती. मुक्त छंद, मुख्य स्पर्धा आणि कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ अशा तीन गटात ही स्पर्धा घेण्यात आली. त्यात, मुक्तछंद मध्ये पुण्याच्या दुर्गामाता मित्रमंडळाने पहिला, शुभम लांडगे यांनी दुसरा, तर पेन- रायगडच्या शंकर नागर यांनी तृतीय क्रमांक पटकावला, तर मुख्य स्पर्धेत नागपूरच्या किल्लेदार प्रतिष्ठाणने प्रथम, नागपूरच्याच शिवप्रताप ग्रुपने दुसरा तर लोणावळयाच्या भैरवनाथ ग्रुपने तृतीय क्रमांक पटकावला. तर कर्जत- जामखेड गटात दिव्यम कोरहाळे यांना प्रथम, अमृता खेटमलास यांना द्वितीय तर प्रिया कुरूमकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला.