वैराग्याच्या क्षणी नको हे जीवन, असे प्रत्येकालाच वाटत असते, अर्थात ती स्मशानवैराग्य म्हणतात, तशी तात्पुरती भावना असते आणि कोणी मरायचे म्हटले, तरी सरकार तसे मरू देत नाही. कारण आत्महत्या हा गुन्हा आहे. त्यावरून इच्छामरण हा विषय अधून मधून चर्चेत येत असतो.
इच्छामरणाची व्याख्या :
इच्छामरण ह्याचा शाब्दिक अर्थ आपल्याकडे बऱ्याचदा शाब्दिक अर्थाने-इच्छा असताना पाहिजे तेव्हा येणारे मरण असा लावला जातो. परंतु तो अर्थ तसा नसून युदेन्शिया ह्या त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ग्रीक शब्दाचा अर्थ “चांगले मरण’ असा आहे. पूर्वी अनेक लोक शांतपणे नीरवानीरव करून मरणाला सामोरे जायचे.
इच्छामरण असावे की नसावे ह्याबद्दल आपल्याकडे वर्षानुवर्ष वाद चालू आहे. योग्य तऱ्हेने ह्या विषयाचे फायदे तोटे मांडले पाहिजेत. तटस्थपणे दोन्ही बाजूंनी ह्या विषयाकडे बघितले पाहिजे. दोन्ही बाजूंची परखड मते तपासली पाहिजेत. आणि दोन ध्रुवांचा तोल सावरत याचा विचार केला पाहिजे. शेवटी प्रत्येकाला त्यातील एक बाजू घ्यावी लागते. मृत्यू आणि त्याविषयी असलेले भय ह्याकडे दोन वेगळ्या पद्धतींनी बघितले जाते. मरणाइतकेच मेल्यानंतर काय होईल हा माणसाला खूप सतावणारा चिंताजनक विषय आहे. मृत्यू-म्हणजे निद्रा-एक चिरनिद्रा! मनुष्य हा नश्वर आहे, हे आपण विसरता कामा नये.
इच्छामरणाच्या विषयावर प्रत्येक व्यक्तीची, समाजाची, देशाची, धर्माची वेगेवेगळी भूमिका असते. ह्या विषयावर होणारे वाद हे कधीही न संपणारे आहेत, साध्या साध्या गोष्टीतील आपले वाद संपत नाहीत. आणि मरण हा विषय तर गहन आहे, माणसाच्या आकलन शक्तीच्या पलीकडचे आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याची सुरवात आणि शेवट चांगल्या रीतीने व्हावा, ही प्रत्येकाची इच्छा असली, ते आपल्या हातात कुठे असते? काही दिवसापूर्वीच ऑस्ट्रेलियातील की कोथल्या तरी देशातील कोणीतरी इच्छामरण घेतल्याची बातमी वाचली होती. इच्छामरणासाठीही त्याला आपला देश सोडून स्वित्झर्लंड की स्वीडस्न असे कोठेतरी मर्सी किलिंगचे सुविधा असलेल्या देशात जावे लागले होते. त्याची आठवण झाली. मर्सी किलिंग असा एक शब्दप्रयोग केला जातो. परंतु त्याचा अर्थ काहीजण वेगळ्या तऱ्हेने पण लावतात. मर्सी किलिंग म्हणजेच दया हत्या आणि इच्छामरण फरक आहे. वर्षानुवर्षे आजारी असलेल्या, परावलंबी व्यक्तीला इच्छामरण हवे असले, त्याच्या घरचे कंटाळलेले असले, तरी त्याला इच्छामरण मिळत नाही. तेव्हा इच्छामरण या विषयाचा कधीतरी सोक्षमोक्ष लागावा अशी इच्छा बाळगायला हरकत नाही.
इच्छामरणाविषयी जनजागृती करून त्याची नियमावली केली, सरकारनी त्या विषयी काही नियम केले तर कदाचित ते वापरता येईल. आजार हा मानसिक आहे की शारीरिक याचाही त्यामध्ये विचार करावा लागेल. मात्र कोणत्याही गोष्टीला विकृत स्वरूप देण्याची आपल्याकडे वृत्ती आहे. इच्छामरणाचा बाबतीत तसे घडू नये