मुंबई: ‘अलिबागवरुन आला आहेस का?’ डायलॉगवर बंदी आणण्याची याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदाराजोग व न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठानं आज हा निर्णय दिला.
हा डायलॉग ‘अपमानजनक’ असल्याच्या भावनेपोटी अलिबागमधील सातीर्जे गावचे रहिवासी राजेंद्र ठाकूर यांनी अॅड. रघुराज देशपांडे यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
सार्वजनिक सादरीकरणात या डायलॉगचा वापर करण्यास बंदी घालावी, अशी विनंती या याचिकेद्वारे केली होती. मात्र या डायलॉगवर बंदी आणण्याची याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे.