कोलाकाता – पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकारने सुरू केलेल्या दोन कल्याणकारी योजनांना संयुक्त राष्ट्राच्या पुरस्कारांसाठी निवडण्यात आले आहे. राज्य सरकारच्या कौशल्य विकास आणि विद्यार्थ्यांना दुचाकी वाटपाच्या या योजनांना संयुक्त राष्ट्राच्या बहुमोल “वर्ल्ड समिटी ऑन इन्फोर्मेशन सोसायटी’ पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे. स्वतः ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी ही माहिती दिली. “उत्कर्ष बांगला’ आणि “सबूज साथी’ अशी या योजनांची नावे आहेत.
या दोन्ही योजनांना संयुक्त राष्ट्राचे पुरस्कार जाहीर झाल्याचे सर्वांना सांगताना, आपल्याला खूप आनंद होत अहे, असे ममता बॅनर्जी यांनी फेसबुकवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. “उत्कर्ष बांगला’ ही योजना गरिबांमध्ये कौशल्युअ विकास करण्यासाठी राबवली जाते. जे कुशल कारागिर स्वतःचा उद्योग सुरू करण्यास पात्र आहेत, त्यांना या योजनेद्वारे सहाय्य केले जात. तर “सबूज साथी’ या योजनेतून सरकारी, अनुदानित शाळा आणि मदरशांमध्ये शिकणाऱ्या इयत्ता 11 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप केले जाते. एकूण 18 श्रेणींअधील
1062 नामांकनांपैकी “उत्कर्ष बांगला’ला निवडण्यात आले. तर “सबूज साथी’ ही योजना पहिल्या पाच योजनांमध्ये चॅम्पियन प्रोजेक्ट म्हणूननिवडण्यात आली आहे.