पुणे – मध्यरात्रीत कोंढवा तालाब कंपनीसमोर बांधकाम करणाऱ्या मजुरांच्या झोपड्यांवर मोठी सीमाभिंत कोसळल्याने या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे आंबेगाव येथील सीमाभिंत कोसळून सहा मजूर मृत्यूमुखी पडले होते. याच दुर्घटनेवरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. दुर्घटनेच्या निष़ेधार्थ दोषींना शासन झालेच पाहीजे आणि कामगारांन्या न्याय मिळाला पाहीजे या मागनीसाठी राज्य सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु आहे.
तत्पूर्वी, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर या दुर्घटनेनंतर ट्विट द्वारे टीका केली होती की, ‘कोंढवा दुर्घटनेने बांधकाम मजूरांच्या सुरक्षेचा मुद्दा किती गंभीर आहे हे समोर आले. बांधकामावर राबणाऱ्या जीवांचे काहीच मोल नाही का? हे कामगार असंघटित क्षेत्रातील आहेत म्हणून त्यांच्या सुरक्षेकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे का? असा सवालही खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे तसेच पुणे महापालिकेने देखील ही घटना गांभिर्याने घ्यावी अशी मागणी केली आहे.’
कोंढवा दुर्घटनेने बांधकाम मजूरांच्या सुरक्षेचा मुद्दा किती गंभीर आहे हे समोर आले.@CMOMaharashtra बांधकामावर राबणाऱ्या जीवांचे काहीच मोल नाही का?हे कामगार असंघटित क्षेत्रातील आहेत म्हणून त्यांच्या सुरक्षेकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे का?@PMCPune ने देखील ही घटना गांभिर्याने घ्यावी.
— Supriya Sule (@supriya_sule) June 29, 2019