कोलकाता – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला काही तास शिल्लक असतानाच राजकीय घडामोडींना वेग येत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नरेद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. मंगळवारी रात्री आपण शपथविधीला हजर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. अखेरच्या क्षणाला ममता बॅनर्जी यांनी यु-टर्न घेतल्यामुळे राजकीय चर्चेला उधान आले आहे.
ममता बॅनर्जी यांनी आपल्या ट्विटरवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये कार्यक्रमात न येण्याचे कारण त्यांनी स्पष्ट केले आहे. या कार्यक्रमाला भाजपने पश्चिम बंगालमध्ये हत्या झालेल्यांच्या कुटुंबियांना बोलवून ही राजकीय हत्या झाल्याचे भासवले आहे. त्यांची हत्या झालेली नाही तर वैयक्तिक कारणामुळे हत्या झालेल्या आहेत.
ममता यांनी चिठ्ठीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये त्या म्हणतात, तुमचे संविधानिक आमंत्रण स्विकारले होते आणि तुमच्या शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. पण गेल्या काही दिवसांमधील रिपोर्टस पाहिले. त्यामध्ये भाजपने कार्यकर्त्यांच्या परिवाराला बोलवले आहे. ज्यांची हत्या राजनैतिक हत्या झाल्याचे सांगितले जाते. त्याचा संबंध पश्चिम बंगालमधील वैयक्तिक हत्येशीही आहे. पण बंगालमध्ये अशी कोणतीही राजकीय हत्या झालेली नाही. बंगालमध्ये झालेल्या हत्या वैयक्तिक भांडणामुळे झाल्या आहेत. त्याचा राजकाराणाशी काही संबंध नाही. त्याला राजकीय रंग दिला जातोय. त्यामुळे सॉरी नरेंद्र मोदीजी आपल्या शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.