पुणे – मध्यरात्रीत कोंढवा तालाब कंपनीसमोर बांधकाम करणाऱ्या मजुरांच्या झोपड्यांवर मोठी सीमाभिंत कोसळल्याने या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला. याच दुर्घटनेवरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. बिल्डर आणि महापालिकेतील दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी विरोधक करत आहेत. यातच बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर या दुर्घटनेनंतर ट्विट द्वारे टीका केली आहे.
कोंढवा दुर्घटनेने बांधकाम मजूरांच्या सुरक्षेचा मुद्दा किती गंभीर आहे हे समोर आले.@CMOMaharashtra बांधकामावर राबणाऱ्या जीवांचे काहीच मोल नाही का?हे कामगार असंघटित क्षेत्रातील आहेत म्हणून त्यांच्या सुरक्षेकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे का?@PMCPune ने देखील ही घटना गांभिर्याने घ्यावी.
— Supriya Sule (@supriya_sule) June 29, 2019
सुप्रिया सुळेंनी यांनी ट्विट केलेलं आहे की, ‘कोंढवा दुर्घटनेने बांधकाम मजूरांच्या सुरक्षेचा मुद्दा किती गंभीर आहे हे समोर आले. बांधकामावर राबणाऱ्या जीवांचे काहीच मोल नाही का? हे कामगार असंघटित क्षेत्रातील आहेत म्हणून त्यांच्या सुरक्षेकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे का? असा सवालही खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे तसेच पुणे महापालिकेने देखील ही घटना गांभिर्याने घ्यावी अशी मागणी केली आहे.