पुणे – मध्यरात्रीत कोंढवा तालाब कंपनीसमोर बांधकाम करणाऱ्या मजुरांच्या झोपड्यांवर मोठी सीमाभिंत कोसळली. अग्निशमन दलाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत एकूण 15 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये मुले आणि महिलांचा समावेश आहे. तर मातीच्या ढिगाऱ्याखालून 3 जणांना सुखरूप बाहेर काढले. दरम्यान, घटनास्थळी एनडीआरएफकडून मदत आणि बचाव कार्य सुरू होते. एनडीआरएफने दिलेल्या महितीनुसार, प्रशिक्षित श्वान बोलावून मातीच्या ढिगाऱ्यखाली कोनं आहे का याची तपासणी केल्यानंतर मदतकार्य थांबविले आहे.
मयतांची नावे