चिंबळी- चिंबळी गावला पिण्यासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीने तसेच इंद्रायणी नदीच्या पाण्याची पातळी खोलवर गेल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थांना रोज पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. यावर्षी सगळीकडे कमी प्रमाणात पाऊस झाल्याने व उष्णतेची तीव्रता वाढल्याने विहिरी, बोअरवेल यांनी तळ गाढला आहे. तर गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतही अल्यल्प पाणी शिल्लक असल्याने गावाला दिवसाआड पिण्याचे पाणी सोडले जात आहे. त्यातच या विहिरीत झाडे-झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने विहिरीचे झरेही काही अंशी बंद पडले असल्याने पाणीपातळी खोलवर गेली आहे. याबाबात ग्रामविकास अधिकारी पी. व्ही. ढवळे म्हणाले की, या विषयावर ग्रामपंचायत बॉडी विचार करीत नसल्याने आम्ही काय करायचे असे उत्तर दिले.