नवी दिल्ली- हैदराबाद आणि दिल्लीतील काही रूग्णालयांनी आमच्याकडे करोनाग्रस्त रूग्णांवर उपचार करण्यासाठी पुरेशी वैद्यकीय उपकरणे नसल्याची प्रतिक्रीया नोंदवली आहे. त्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रीया देताना म्हटले आहे की, हा धोका आपण वेळीच लक्षात घेतला नाही.तो लक्षात घेतला असता तर आपल्याकडे पुर्व तयारीसाठी बराच वेळ होता पण तो वेळ आपण वाया घालवला आहे. आपण याचे गांभीर्य वेळीच लक्षात घेतले असते तर आपल्याला त्यासाठी बरीच तयार करणे शक्य होते.
राहुल गांधी यांनी आपल्या या ट्विटर संदेशासोबत डॉ. कामना कक्कर या सरकारी डॉक्टरचा ट्विटर संदेशही जोडला आहे. या संदेशात डॉ कक्कर यांनी म्हटले आहे की, जेव्हा आमच्याकडे मदत येईल त्यावेळी एन 95 दर्जाचे मास्क आणि हातमोजे माझ्या थडग्यावर पाठवा. टाळ्या आणि थाळ्याही वाजवा, वा – एक निराश सरकारी डॉक्टर असे त्यांनी या संदेशात म्हटले आहे.
सरकारी दवाखान्यात करोनाचा मुकाबला करण्यासाठी पुरेशी व्यवस्था तर नाही पण तेथे कार्यरत असलेल्या डॉक्टरांच्या सुरक्षेसाठीही व्यवस्था नसल्याची बाब या ट्विटर मधून ध्वनीत झाली असून तो संदेश राहुल गांधी यांनी मुद्दामहून सरकारच्या निदर्शनाला आणला आहे.
अगदी बरोबर आहे.अशीच तक्रार नाशिक येथील सिव्हिल हाँस्पिटल मधील ऐका महिला ईनटर्न ने सोशल मेडीया वर केली आहे.दुसरे सुरूवातीला परदेशातून येणाऱ्या हवाई प्रवाशांची तपासणी सुरू केली त्यामध्ये दुबई वरुण येणारे प्रवाशी वगळले होते.क्वारनटाईन विभागाच्या ढिसाळपणामुळे रुग्ण संख्या वाढली.