लखनौ – उत्तर प्रदेशमधील भाजप सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान अन्न योजना तीन महिन्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. मार्च 2022 साठी लागू करण्यात आलेली योजना आता मे पर्यंत सुरू राहणार आहे. यामध्ये 15 कोटी लोकांना मोफत राशन देण्याची तरतूद आहे.
योगी आदित्यनाथ सरकारचा पहिला निर्णय, पुढील तीन महिने राज्यातील 15 कोटी जनतेला डाळ, मीठ, साखर इ. ही योजना मार्च २०२२ मध्ये संपत होती. भाजपच्या विजयात “मोफत राशन” या योजनेचा मोलाचा वाटा आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर या निर्णयाची माहिती माध्यमांना दिली. ते म्हणाले की, नव्याने स्थापन झालेल्या सरकारचा पहिला निर्णय म्हणजे, पंतप्रधान अन्न योजना आम्ही तीन महिन्यांनी वाढवत आहोत.
करोनाच्या काळात पंतप्रधान अन्न योजना सुरू झाली. देशातील 80 कोटी लोकांना त्याचा लाभ मिळत होता. यापूर्वी ही योजना मार्च २०२२ पर्यंत होती. या योजनेंतर्गत अन्नधान्याबरोबरच डाळींची पाकिटे आणि मीठ, साखर आदीही देण्यात येत होते. पुढील तीन महिने राज्यातील 15 कोटी जनतेला याचा लाभ मिळत राहील.
आमच्या पहिल्या कॅबिनेटने हा निर्णय घेतला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक आणि कॅबिनेट मंत्री सुरेश कुमार खन्ना आणि स्वतंत्र देव सिंह उपस्थित होते. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी सांगितले की, या योजनेवर सुमारे 3270 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.