नवी दिल्ली – शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढण्याकरता स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त किसान मोर्चाच्या संचालन समितीचे सदस्य योगेंद्र यादव यांनी आज राजीनामा (Yogendra Yadav Resignation) दिला आहे. समितीच्या 9 सदस्यांपैकी चार सदस्यांनी यापूर्वीच राजीनामा दिला असल्यामुळे हा किसान मोर्चाला बसलेला मोठा हादरा मानला जातो आहे.
लखीमपूर येथील घटनेला 3 ऑक्टोबर रोजी वर्ष होत असल्यामुळे शेतकरी संघटनांकडून या दिवशी देशभरात ब्लॅक डे पाळला जाणार आहे. त्यापूर्वीच ही घडामोड घडली आहे.
संयुक्त किसान मोर्चा को मेरा पत्र:
सभी जनांदोलनों और विपक्षी राजनीतिक दलों के बीच समन्वय की अपनी प्राथमिकता के चलते मुझे संयुक्त किसान मोर्चा की कोआर्डिनेशन कमेटी की जिम्मेवारी से मुक्त किया जाए।”जय किसान आंदोलन” का सदस्य होने के नाते मैं संयुक्त किसान मोर्चा का सिपाही बना रहूंगा pic.twitter.com/DygwTFyRM2— Yogendra Yadav (@_YogendraYadav) September 4, 2022
दरम्यान, समितीला आपण वेळ देऊ शकत नसल्यामुळे राजीनामा देत असल्याचे योगेंद्र यादव यांनी सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भारत जोडो यात्रेच्या कार्यकर्ता समितीचे सक्रिय सदस्य असल्यामुळे यादव संयुक्त किसान मोर्चाच्या समितीला वेळ देऊ शकत नसल्यामुळे त्यांनी बाजुला होण्याचा निर्णय घेतला आहे.
दिल्लीत जेव्हा आम आदमी पार्टीची स्थापना झाली होती तेव्हा यादव या पक्षाशी जोडले गेले होते. मात्र नंतर मतभेद झाल्यावर त्यांनी या पक्षापासून फारकत घेतली. अलिकडेच दिल्ली सरकारच्या दारू धोरणावर त्यांनी जोरदार टीका केली होती. यादव यांची स्वत:ची स्वराज संघटन नावाची गैर राजकीय संघटना आहे.